कोलकाता : अहमदाबादकडे निघालेले एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही वेळातच एनएससीबीआयच्या विमानतळावर परतले.विमान दुर्घटनेनंतर अहमदाबादमधील विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले. त्यामुळे, कोलकाताहून दुपारी १.४९ वाजता निघालेले इंडिगोचे ६ई-३१८ विमान दुपारी २.५२ च्या सुमारास कोलकात्याला परतले. कोलकाता येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) प्रवक्त्याने याबाबतची माहिती दिली. या विमानात १७९ प्रवासी होते. ते कोलकात्याहून अहमदाबादकडे निघाले होते. पण, अहमदाबादहून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळल्याने हा निर्णय घेण्यात आला.
Fans
Followers